मिञा, या जगात जगायचं असेल तर जगाची भाषा कळली पाहिजे अन् नुसती कळुन चालणार नाही . आपल्यालाही त्या भाषेत बोलता आलं पाहिजे . इथं अंतरांना अर्थ असतो अन् अर्थांमध्ये देखील अंतर असतं.... इथं नाती तयार होतात ती गरजेनुसार ...इथल्या सगळ्या कल्पनाच भ्रामक , त्या फसव्या आपल्याला फसवत राहणार ..... इथं आपण आपल्यावर प्रेम करावं... इतरांवर प्रेम करावं.... पण इतरांनी आपल्यावर प्रेम करावंच , हा अट्टाहास करण्यासाठी हे जग नाही. जिथे बालहट्ट पुरे होत नाहीत.... तिथे तुझे तारुण्यातले हट्ट कसे पुरे होतात.....
# असंच काहितरी