महाविद्यालयीन जीवन म्हणजे आयुष्यातले सोनेरी दिवस पण ह्याच सोनेरी दिवसांना काळी करडी किनार लाभली तर आयुष्यात एक उदासीच भरुन राहील हे निश्चितच...अशीच उदासी घेऊन जगणाऱ्या.... आयुष्यात सर्व छान चालु आहे असं वाटत असताना वेळोवेळी ज्याचं आयुष्य वळणं घेत जातं अशा व्यक्तीची...तिच्या आयुष्यातल्या घटना, प्रसंग अन् व्यक्तींची अगदी खुलेपणाने मांडणी करणारे अंतरंगातील बोल्ड काळेकरडे स्ट्रोक्स म्हणजे प्रणव सखदेव यांची साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त काळेकरडे स्ट्रोक्स ही कादंबरी....
ही कथा आहे समिरची...त्याच्या जवळचे मिञ असलेल्या चैतन्य, सानिका, सलोनीची...हे तिघे समिरच्या आयुष्यात कसे आले अन् गेले याची कथा अन् व्यथा ह्यात आहे...चैतन्यचं जाणं हा अपघात, सानिकाचं जाणं हे आश्चर्य तर सलोनीचं जाणं हे अटळ....या सगळ्या उलथापालथी होत जाताना मनातल्या कोलाहलाला शमवण्यासाठी व्यसनाची साथ ...अन् आयुष्याच्या पावलो पावली आवश्यक तिथे आवश्यक ते मोलाचं जगण्याचं तत्वज्ञान शिकवणारी समिरला भेटणारी माणसं...ही कथा समिरची आहेच, पण यासोबतच दादु काकाची आहे..हिमालयातल्या वयस्कर जोडप्याची आहे...समिरला वेळोवेळी काय करावं अन् काय टाळावं याचं खुल्लमखुल्ला ग्यान देणाऱ्या अरुणची आहे....अशा कथेत बारीक सारीक उपकथा आहेतच..अन् ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्याला थोड्याफार फरकाने का होईना रिलेट होत जातात...अजुन एक जमेची बाजु म्हणजे कथेची भाषा ही बऱ्याच ठिकाणी आपल्या आजच्या पिढीची अशी मिंग्लिश म्हणजे मराठी-इंग्रजी मिक्स आहे..काहींना ही एका बिघडलेल्या मुलाची कथाही वाटु शकेल, पण ही बिघडलेल्या नाही तर घडलेल्या मुलाची अत्यंत खुलेपणाने मांडलेली व्यथा आहे हेच जास्त वाटत राहते...आयुष्यात काय करावं, यासोबतच काय करु नये या दोन्हींचा परामर्श घेणारी ही आपल्या पिढीची अन् आपल्या पिढीने लिहीलेली कादंबरी एकवेळ अवश्य वाचायला हवी...
#असंच_काहितरी
#Book_Review
No comments:
Post a Comment