आयुष्यावर बोलु काही.....
आयुष्य.... खरं तर हा शब्दच पुरे ठरतो सारं काही सांगण्यासाठी. खरं म्हणजे आयुष्य म्हणजे काय...? मी काही कागदी तत्वज्ञान पाजणार नाही. जे मनात आलं ते सहजं इथं उतरलंय....
जन्म आणि मृत्यु यांच्यातलं अंतर म्हणजे आयुष्य की हे अंतर कापण्याचं तंञ म्हणजे आयुष्य ?... नेमकं काय ....? सारं अगदी मनासारखं मिळावं अशी अपेक्षा असेल तर नाहीच येणार आयुष्यात मजा. आयुष्य हे कधी कधी मला झाडासारखं वाटतं ... आपलीच फळ आपल्याला न खाता येण्याजोगं .... म्हणजे आपल्या प्रयत्नावर दुसर्याचीच होते मजा आणि आपण माञ हापापलेलेच आनंदासाठी.... कधी कधी आयुष्य वसुंधरेसारखं वाटतं मला .... अगदी सारं सहन करत राहायचं... कितीही काही झालं तरी स्थिर , अचल....
आयुष्य खरं तर कोडंच आहे .... न सुटणारं.... आयुष्य फार रटाळ वाटतं जर आपण आपलंच पाहिलं... आयुष्य काय हे तुम्हाला आरशासमोर उभा राहुन नाहीच कळणार कधी ते. तसं आयुष्याला जुगारही म्हणतील काही जण. अगदी पुढच्या क्षणी कुठलं पान आपल्या हाती येईल हे माहित नसणार्या त्या खेळासारखं.... पान कसंही येवो ते चांगल्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो.... आयुष्य अगदीच काट्यावर चालणंही नव्हे अन् फुलावर झुलणंही नव्हे ... आयुष्याची किंमत कळली त्यांनाच काहितरी किंमत असते.... जाणिवा बोथट झाल्या , विवेक गहाण पडला अन् विचार अशक्त झाले , की आयुष्य म्हणजे काय ? हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडायला लागतो....
अशावेळी जगणं महाग अन् मरण स्वस्त वाटायला लागतं....
का...? हा अद्याप तरी सहन न होणारा गहन प्रश्नच आहे फक्त.....
*www.shashichyamanatale.blogspot.com*
No comments:
Post a Comment