Tuesday, August 28, 2018
Tuesday, August 21, 2018
पावसाळी ढग
पावसाळी ढग.......
कालची रिमझिम , तुझ्याही गावात झाली
सकाळ सकाळी गावात ओरडा होता
माञ माझा गाव , अद्यापही कोरडा होता.....
तुझ्यासारखेच ढगानेही , गावाला गाळले माझ्या
वार्याने वावराला , मुद्दाम टाळले माझ्या.....
शेजारच्या गावात , धो धो पाऊस पडतो आहे
माझ्या गावावरुन वाहणार्या वार्याला
तिथे कुठला हिमालय अडतो आहे.....
ढग भरुन येतात , वरुन जातात
गाव सुका सुकाच राहतो
तुझ्या गावातला बोलका पाऊस
माझ्या गावात मुकाच राहतो......
सगळीकडे पाऊस , नदी नाल्यांतुन वाहतो आहे
माझा माञ गाव , ढगाकडेच पाहतो आहे......
तुझ्यासारखेच ढग , आता गावाला छळत असतात
न बोलताच , न थांबताच पळत असतात......
तु नाही आली तरी चालेल
पाऊस आला पाहिजे
मन कोरडं राहिलं तरी चालेल
माती चिंब झाली पाहिजे.......
तुझ्या काय , माझ्या काय
जरी घरावर एकच आभाळ आहे
तुझ्या वेगळ्या ललाट रेषा
माझं वेगळं भाळ आहे......
घर गळेल माझं , एवढा पाऊस पडु दे
काळजातला जाळ जळेल , एवढा पाऊस पडु दे.....
तुझ्या घरावरुन जाणार्या ढगांना
माझ्या घरावर बरसायला सांगुन बघ
माझ्यासाठी किमान एकदा
एवढंच वरदान मागुन बघ......
*www.shashichyamanatale.blogspot.com*
कालची रिमझिम , तुझ्याही गावात झाली
सकाळ सकाळी गावात ओरडा होता
माञ माझा गाव , अद्यापही कोरडा होता.....
तुझ्यासारखेच ढगानेही , गावाला गाळले माझ्या
वार्याने वावराला , मुद्दाम टाळले माझ्या.....
शेजारच्या गावात , धो धो पाऊस पडतो आहे
माझ्या गावावरुन वाहणार्या वार्याला
तिथे कुठला हिमालय अडतो आहे.....
ढग भरुन येतात , वरुन जातात
गाव सुका सुकाच राहतो
तुझ्या गावातला बोलका पाऊस
माझ्या गावात मुकाच राहतो......
सगळीकडे पाऊस , नदी नाल्यांतुन वाहतो आहे
माझा माञ गाव , ढगाकडेच पाहतो आहे......
तुझ्यासारखेच ढग , आता गावाला छळत असतात
न बोलताच , न थांबताच पळत असतात......
तु नाही आली तरी चालेल
पाऊस आला पाहिजे
मन कोरडं राहिलं तरी चालेल
माती चिंब झाली पाहिजे.......
तुझ्या काय , माझ्या काय
जरी घरावर एकच आभाळ आहे
तुझ्या वेगळ्या ललाट रेषा
माझं वेगळं भाळ आहे......
घर गळेल माझं , एवढा पाऊस पडु दे
काळजातला जाळ जळेल , एवढा पाऊस पडु दे.....
तुझ्या घरावरुन जाणार्या ढगांना
माझ्या घरावर बरसायला सांगुन बघ
माझ्यासाठी किमान एकदा
एवढंच वरदान मागुन बघ......
*www.shashichyamanatale.blogspot.com*
Saturday, August 18, 2018
आयुष्यावर बोलु काही
आयुष्यावर बोलु काही.....
आयुष्य.... खरं तर हा शब्दच पुरे ठरतो सारं काही सांगण्यासाठी. खरं म्हणजे आयुष्य म्हणजे काय...? मी काही कागदी तत्वज्ञान पाजणार नाही. जे मनात आलं ते सहजं इथं उतरलंय....
जन्म आणि मृत्यु यांच्यातलं अंतर म्हणजे आयुष्य की हे अंतर कापण्याचं तंञ म्हणजे आयुष्य ?... नेमकं काय ....? सारं अगदी मनासारखं मिळावं अशी अपेक्षा असेल तर नाहीच येणार आयुष्यात मजा. आयुष्य हे कधी कधी मला झाडासारखं वाटतं ... आपलीच फळ आपल्याला न खाता येण्याजोगं .... म्हणजे आपल्या प्रयत्नावर दुसर्याचीच होते मजा आणि आपण माञ हापापलेलेच आनंदासाठी.... कधी कधी आयुष्य वसुंधरेसारखं वाटतं मला .... अगदी सारं सहन करत राहायचं... कितीही काही झालं तरी स्थिर , अचल....
आयुष्य खरं तर कोडंच आहे .... न सुटणारं.... आयुष्य फार रटाळ वाटतं जर आपण आपलंच पाहिलं... आयुष्य काय हे तुम्हाला आरशासमोर उभा राहुन नाहीच कळणार कधी ते. तसं आयुष्याला जुगारही म्हणतील काही जण. अगदी पुढच्या क्षणी कुठलं पान आपल्या हाती येईल हे माहित नसणार्या त्या खेळासारखं.... पान कसंही येवो ते चांगल्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो.... आयुष्य अगदीच काट्यावर चालणंही नव्हे अन् फुलावर झुलणंही नव्हे ... आयुष्याची किंमत कळली त्यांनाच काहितरी किंमत असते.... जाणिवा बोथट झाल्या , विवेक गहाण पडला अन् विचार अशक्त झाले , की आयुष्य म्हणजे काय ? हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडायला लागतो....
अशावेळी जगणं महाग अन् मरण स्वस्त वाटायला लागतं....
का...? हा अद्याप तरी सहन न होणारा गहन प्रश्नच आहे फक्त.....
*www.shashichyamanatale.blogspot.com*
Monday, August 13, 2018
तिच्याविना श्रावण
*--------- श्रावण ----------*
शोधु नकोस मजला
या दाटलेल्या ढगात....
मी मग्न माझ्या नभात
मी मग्न माझ्या जगात......
होताच रिमझिम जराशी
आठवेल मी तुला.....
बसुनी एकांती खिडकीपाशी
शोधशील तु मला.....
मी गंध होतो पसार झालो
तु तशीच राहिलीस फुला.....
तु तिथे मी इथे झुरत असेल
माञ एकटाच झुलत असेल,
तो श्रावणातला झुला.........
आजही श्रावण
बरसत येतो जेंव्हा
तुझ्यावाचुन मी
तरसत असतो तेंव्हा......
तु माझे जग होतीस
तुझे जग झालो नाही
मी कुणाच्याच जगाचा
मग भाग झालो नाही
झाले गेले सारे
विसरुन जायला हवे ना....?
आपापल्या जगात
सुखात जगायला हवे ना ....?
पण.....,
आजही एकटाच
श्रावण पाहतो आहे
एकांती तुझेच
गीत गातो आहे........
नशिब ! एवढे तरी करु शकतो....
तुला आठवुन ,
रित्या आयुष्याचा पेला भरु शकतो.........
# असंच काहितरी.......
@ त्या दुरस्थास.... जो मनाच्या कायम जवळ आहे......
www.shashichyamanatale.blogspot.com
शोधु नकोस मजला
या दाटलेल्या ढगात....
मी मग्न माझ्या नभात
मी मग्न माझ्या जगात......
होताच रिमझिम जराशी
आठवेल मी तुला.....
बसुनी एकांती खिडकीपाशी
शोधशील तु मला.....
मी गंध होतो पसार झालो
तु तशीच राहिलीस फुला.....
तु तिथे मी इथे झुरत असेल
माञ एकटाच झुलत असेल,
तो श्रावणातला झुला.........
आजही श्रावण
बरसत येतो जेंव्हा
तुझ्यावाचुन मी
तरसत असतो तेंव्हा......
तु माझे जग होतीस
तुझे जग झालो नाही
मी कुणाच्याच जगाचा
मग भाग झालो नाही
झाले गेले सारे
विसरुन जायला हवे ना....?
आपापल्या जगात
सुखात जगायला हवे ना ....?
पण.....,
आजही एकटाच
श्रावण पाहतो आहे
एकांती तुझेच
गीत गातो आहे........
नशिब ! एवढे तरी करु शकतो....
तुला आठवुन ,
रित्या आयुष्याचा पेला भरु शकतो.........
# असंच काहितरी.......
@ त्या दुरस्थास.... जो मनाच्या कायम जवळ आहे......
www.shashichyamanatale.blogspot.com
Subscribe to:
Posts (Atom)