Saturday, January 26, 2019

ग्रेट भेट.....# सन्मान कवितेचा # अभिमान माझा


आज शासकीय विश्रामगृह(अजिंठा विश्रामगृह , जळगाव) येथे अनाथांची‌ माय डाॅ. सिंधुताई सपकाळ यांची भेट घेण्याचे भाग्य लाभले.... माई सागर पार्क येथे पार पडत असलेल्या बहिणाबाई महोत्सवात बोलण्यासाठी आलेल्या असताना श्री संदिप महाजन सरांनी कळवल्यानंतर लगेच भेटायला निघालो. केवळ महाजन सरांमुळे माईंना भेटता आले हेही खरे. माईंना भेटल्यानंतर महाजन सरांनी ओळख करुन दिली व मी माईंवरती एक कविता केली असल्याचे त्यांना सांगितले. माईंनी लगेच म्हटले ," ऐकव की लवकर मग " अन् मी कविता ऐकवली. एका एका शब्दानंतर मिळणारी माईंची दाद मला कित्येक पुरस्कारांपेक्षाही जास्त आनंद देत होती. कविता ऐकताना काही शब्दांची पुनरावृत्ती झालीय  असं वाटल्यानंतर माईंनी लगेच सांगितले , " बाळ‌ सगळं कसं चौकटीत पाहिजे , मग ते जगणं असेल नाही तर कविता असेल. माणसानं एका चौकटीत असावं." मध्येच एका ओळीत मी ताई हा शब्द वापरलेला होता . ते ऐकल्यावर माई म्हणाल्या , " ताई नको माई म्हण , अरे आई म्हणताना सुद्धा ओठाला ओठ लागत नाहीत ,पण ओठाला ओठ भिडल्याशिवाय माई म्हणताच येत नाही. माई म्हण....." पुढे सगळी कविता ऐकल्यावर माई‌‌ म्हणाल्या ," काय लिहतोस तु ! तु हाडाचा कवि आहेस. तुझी ही कविता मला पाठव . मी ही कविता माझ्या संस्थेत फ्रेम करुन लावेल. तुझा नंबर दे. आणि हो , कधीपुण्याला‌ आलास..? नाही...? " अन् महाजन सरांना सांगितले ," याला घेऊन ये...
अवघ्या काही मिनिटांची ती भेट , पण अमुल्य असा ठेवा ठरावी असे ते क्षण होते....
माई बोलत होत्या अन् मी भारावुन जात होता. आपले शब्द आज धन्य झाले असं‌ आतुन वाटत होते. माझ्यासाठी हा कवितेचा सर्वोच्च सन्मान आहे.....
कविते हे सारं तुझ्यामुळेच....
सारं काही तुझंच आहे.....मी फक्त निमित्त माञ...

माईंनी पुस्तकात लिहिलेल्या ओळी ,
*" शशिकांत , तु आग पितोस . शब्दात ती ओततोस आणि कवितेची धग पेटती ठेवतोस. "*

माईंचा संदेश‌ ( जो आजन्म स्मरणात राहिल असा )
*" आयुष्याच्या झळा ,  झेलत रहा बाळा...."*

#अनाथांची माय .....
#वेदनेचा बाजार नव्हे बाजाराची वेदना मांडता आली पाहिजे......

मी अद्याप काय कमावले असे कुणी विचारले तर ही अन् अशा मोठ्या माणसांच्या कौतुकाच्या थापा हिच माझी कमाई आहे , एवढेच मी सांगु शकेल....... अजुन खुप काही करायचंय अन् खुप दुर जायचंय.... ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी ही सारी माझी प्रेरणास्थानं‌ आहेत......

🖋 शशिकांत शांताबाई मारोती बाबर....
(लिड इंडिया २०२०, जळगाव)

1 comment:

Balu gadhave said...

Congratulations shashikant........Keep it up