मी शेंगा खाल्ल्या नाहीत,
मी टरफलं उचलणार नाही
असं कुणी म्हणत नाही आता
आता टरफलं सुद्धा खाल्ली जातात
शेंगा खाल्ल्याचा सुगावाच लागु नये म्हणुन
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
पण त्यातही ज्याचा त्याचा वाटा ठरलेला हे पक्कं आहे
स्वराज्य मिळालंय आता, पंच्याहत्तर वरसं झालेत
पण स्वातंञ्य कंच्च्या गाढवीणीचं नाव आहे ?
असा प्रश्न आजंही कित्येकांना पडतो आहे........
कारण इथे स्वकियंच स्वकियांना नडतो आहे......
तुम्हाला मंडालेच्या तुरुंगात उलगडलं गीतारहस्य
म्हणुनंच पारतंञ्याचं भयान जंगल
तुम्ही सिंहगर्जनेनं जागं केलत......
आता सिंहगर्जना कसली....?
आश्वासनांची खैरात असते..........
निवडणुकीचा दिवस असतो
पण घडवणुकीची रात असते........
स्वदेशीपेक्षा देशीवर देश चालतो आहे
तेंव्हा वाटतं,
मीच माझ्या देशाला मातीत घालतो आहे
सत्तेसाठी लाचारी कित्येकांना मान्य आहे
सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का ?
विचारणारा कुठे लोकमान्य आहे.........?
#असंच_काहितरी
भारत मातेच्या ह्या नरकेसरीच्या स्मृतिस त्याच्या जयंतिदिनी विनम्र अभिवादन....🙏
No comments:
Post a Comment