तु भेटलीच नसतीस तर बरं झालं असतं
माझंही जगणं इतकं देखणं झालं नसतं
माझंही जगणं इतकं देखणं झालं नसतं
तुझा नकार मान्यंच, तुझं कारण खरं नव्हतं
तु कारणंच दिलं नसतस,
तर बरं झालं असतं ..............
तु भेटुन बोलुया म्हणालीस,
अन् यापुढे भेटायचं नाही एवढंच बोललीस
तु भेटायला बोलावलंच नसतस,
तर बरं झालं असतं ...............
इथुन पुढे आपलं पटणार नाही,
मला हे पटवुन दिलंस तु अन् निघुन गेलीस
मला हे आधीच पटलं असतं,
तर बरं झालं असतं ................
मेंहदी लागल्या हातांना पावसात धरशील तेंव्हा
मनात आग लागल्या शिवाय राहणार नाही
मी तेंव्हा तुझ्यासोबत पावसात भिजलो नसतो,
तर बरं झालं असतं ..............
आयुष्याचा नवा डाव रचताना
मला विसरुन जाणारंच तु
मी उद्या मोडणारा डाव, काल रचलाच नसता,
तर बरं झालं असतं ..............
झाले गेले विसरुन जाऊ,
आपापल्या संसारात सुखी राहु
असंच काहितरी बोललीस तु मला मांडवात
मी तुझ्या लग्नाला आलोच नसतो,
तर बरं झालं असतं............….
#असंच काहीतरी
No comments:
Post a Comment