Monday, August 29, 2016

सोसल तेवढच सॊशल

पटलं तर घ्या 📖📖📖
----------------------------------------

*सोसल तेवढंच सोशल*

खरे तर आज प्रगतीचे युग आहे . या स्पर्धेच्या, तंञज्ञानाच्या ,विज्ञानाच्या आणखी कशाच्या म्हणता येईल त्या युगात आपण जगत आहोत . सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत नव्हे बनलाच आहे . वर्तमानपञ,इंटरनेट या बरोबरच व्हाँटस अप, फेसबुक अन् व्टिटरच्या माध्यमानं त्याची व्याप्ति वाढली आहे . अबोलकी माणसंही या निमित्ताने बोलकी झाली.माणसानं नव्याचं स्वागत जरुर करावं पण जुन्याचा आदर्शही विसरता कामा नये. आज आम्ही या सोशल मिडियाचा किती वापर करतो आहोत . यामुळे आपण वेळ असुन व्यस्त झालो आहोत. पुर्वीच्या घरी रामकृष्ण अन् विरशिवाजीच्या गोष्टी सांगत असे आजी पण आता मोबाईलनच मारलीय बाजी. बाळ असते गुंग त्याच्या मोबाइल मध्ये अन् आजी बिचारी निवांत. त्या मोबाईलमध्येच तो कसल्या कसल्या गोष्टी पाहतो, ऎकतो ,मग दुसर्या गोष्टी ऐकायला त्याला वेळच कसा मिळणार अन् तसेही यमी अन् मम्मी एवढंच कळणार्या त्याला त्या आजीच्या राजाराणीच्या अन् सोनपरीच्या गोष्टी कशा कळणार. आणि गोष्टीतल्या सोनपरी ऐकायला त्याला कसे चालणार ,त्याची परी त्याला रोजचं हायबाय करत असतेच की आॅनलाईन . पूर्वी आपल्या घरची सुरवात जात्यावरच्या ओव्यांनी व्हायची आता हिच सुरवात एकाकीपणाच्या जाणिवेने अन् बारकाव्यांनी होते.पूर्वी घरची सकाळ आस्था टिव्हीने व्हायची आता हिच सकाळ एम टिव्हीने सुरु व्हायला लागली अन् साहजिकच राञ ' *तुका झालासे कळस* 'ने नाहितर ' *तुक्या तुकविला नाग्या नाचविला* 'ने होते. मी हे सर्व का सांगतोय ? सोशल मिडियाचा वापर तोही (गैर) वापर होतं असल्याने हे चिञ आहे . आज मोबाइल ही चैनीची वस्तु न राहता गरज बनली आहे. एवढच नाहितर या गोष्टींचं व्यसनं बनत चाललय. तंञज्ञानाने जगाला जवळ आणले हे जरी खरे असले तरी या सोशल मिडियाच्या अतिवापराने दुर दुर गेलीत माणसे. एकाच घरात राहणार्यांही परस्परात बोलायला वेळ नाहियं. सारं काहि अगदी तळहातावर हवं, अशी आपली मानसिकता झालीय. सार्याच गोष्टी जरा गुगल करुन बघु, म्हणत पाहिजे असतात आपल्याला . *परस्परांची नाती जपण्यापेक्षा या सोशल मिडियाच्या तेलानं ती वातीसारखी जळु लागलीत*. शेवटी एवढंच *या सोशल मिडियाचा सोसल तेवढाच वापर व्हावा*  कारण *आईचे प्रेम अन् पावसाचा थेंब अजुन तरी नेटवर मिळत नाहीच*.

✍शशिकांत मा. बाबर
( शिवव्याख्याते,बोररांजणी, जि. जालना )

विविध विषयावरील बहुरंगी लेख,कविता वाचण्यासाठी संपर्क 👇👇👇
मो.९१३०६२०८३४(what'sapp)
shashikantbabar12@gmail.com

Sunday, August 28, 2016

राञ

💥  राञ....💥

उद्याची स्वप्न याच राञीत
असतात पहुडलेली
सारी शांत होतात मेंदु
काही काळ का होईना
विसरली जातात विचार नडलेली ॥

हिच ती राञ असते
जिच्या उदरात साठवलेला आहे गर्द काळोख
याच राञीच्या स्वप्नात होते   काहिंची ओळख
कधी कधी वाटते मी कुठे असा विचार केला
मग का तरी हा भयान पसारा सामोरी आला ॥

खरच हि राञ विलक्षण असते
कुठे सारे शांत निवांत असते
कुठे निद्रेचीही भ्रांत नसते
कुठे असतो मिणमिणता उजेड पणतीचा
कुठे लख्ख दिव्यांचा प्रकाश सोबतीला
कुठे उजेड निद्रित देहास साथीला
कुठे घासाडते शिव्या माय विझणार्या वातीला ॥

हि राञ साक्षीला कित्येक मिलनांच्या
त्याच्या झिंगल्या नशेतही विलनांच्या
अंधाराचे अधिराज्य गाजवणारी
रातकिड्यांची गुणगुण कानी वाजवणारी
हि सारी रामकहानी राञीची आहे
नको समजु भंकस याला
गोष्ट राञीची सारी खाञीची आहे ॥

✍शशिकांत मा. बाबर
📱९१३०६२०८३४
२५/०८/२०१६ ( १:१५ am)

नवाच प्रश्न

नवाच प्रश्न ......

पाहताच तुजला आज सये
मी ऊगाच बावरलो होतो ।
मग हळुच येता भान जराशे
मी माझाच सावरलो होतो ॥

पाहताच तुझा तो चेहरा
हसलो ऊगाच गाली ।
तुझ ओठांतुन शब्दन् फुटले
पण बोलली बरेच लाली ॥

तुझ नयनांनी मज नयनांशी
हळुच सारे सांगावे ।
मुक्या आपुल्या गीतांचे
मग किस्से हळुच पांगावे ॥

वाटेल तुझला विचिञ सारे
अन् भासेन मी ग वेडा ।
पण मी आपुला साधा भोळा नंदी
तुझ भासलो जरी ग रेडा ॥

मज अंतरी जे दाटले
ते यात सारे मी मांडले ।
बघ आज अचानक कसे
भाव अंतरीचे इथे सांडले ॥

सये माझ्या प्रेमाची ग
जरा न्यारीच आहे रीत ।
लोकांची प्यारी शायरी
पण माझे साधे गीत ॥

आत्ताच नको तु विचार करु
मी कोण कुठला कळेलच तुला ।
तु उत्तर माझ्या प्रश्नांचे जरी
आज नवाच प्रश्न पडलाय मला ॥

✍शशिकांत मा. बाबर
📱९१३०६२०८३४
www.shashichyamanatale.blogspot.com

तुझा गाव

तुझा गाव तसा राहिला नाही

                 कवि:- शशिकांत मा. बाबर
                  संपर्क:-९१३०६२०८३४

जिकडे तिकडे नुसतीच गर्दी बाहुल्यांची
दिसते मजला नुसतीच गर्दी साउल्यांची
गावाचा शिवार ही तसा राहिला नाही
झुडपात तिथेही कुठे आता
ससा राहिला नाही
तुझा गाव तसा राहिला नाही

असायचा सगळीकडेच नुसताच बोलबाला
असो पोळा अथवा गोपाळकाला
सगळेच कसे जमायचे
अगदी घरच्या सारखे
आता झाली पाखरे घरट्यास पारखे
देती सढळ हाताने तो पसा राहिला नाही
खरच तुझा गाव तसा राहिला नाही

होता कसा कट्टा, चालायची आपुली थट्टा
आता कुठे दिसते तसे
बदलले इतक्यात कसे
साधीच राहायची पोरं,आता करती बघ नट्टापट्टा
ऎकु येत नाही आता कुठे गोसायाची गाणी
विसरला गायाचे की तो घसाच राहिला नाही
पण खरच तुझा गाव तसा राहिला नाही

तु म्हणशील नेमका कसा राहिला नाही
मंदिरात दिव्यांचा आरास राहिला नाही की
पहाटेचा प्राजक्ताचा गंधाळ वास राहिला नाही
आपुलकी अन् मायेचा तो साथ राहिला नाही की
ध्यानात तुझ्या तो घात राहिला नाही
ते काहिहि असो, पण आपुलाच आपल्या हातात हात राहिला
मग जर तुच तसा राहिला नाही
तर गावही तसा राहिला तरी कसा ॥

www.shashichyamanatale.blogspot.com

माफी मागु नकोस

🙏माफी मागु नकोस 🙏

            कवि :- शशिकांत मा. बाबर
            संपर्क :- ९१३०६२०८३४

सारा गाव झोपल्यावर तु माझ्याकडे ये
अलगद येवून मला तुझ्या मिठीत घे
एकदा का आलीस मिठीत
पुन्हा हात मोकळे करु नकोस ॥

हा बेभान वारा झोंबेलच तुला
पण म्हणुन घाबरायच कारण नाही
हे वारेही श्वासाहुन वेगळे धरु नकोस ॥

बर्याच दिसांचे तुला बोलायचे बरेच काही
सांगायचे तुला सारे खरेच काही
हरवेळी मी असचं ठरवतो काही बाही
पण कधी तु येत नाही, कधी शब्द ओठी येत नाही ॥

आज जर आलीच तु
तर लगेच कारणं विचारु नकोस
अन् मी नाहीच काही बोललो
तर लगेच परतीची वाट धरु नकोस ॥

अन् जर नाहीच जमलं तुला येणं
तर झोपेचं कारण सांगु नकोस
पुन्हा येईल म्हणत माफीही मागु नकोस ॥
www.shashichyamanatale.blogspot.com

Monday, August 15, 2016

अक्षरमोती ओंजळीतले: पुल

अक्षरमोती ओंजळीतले: पुल: Links

वेदना

📌😌 वेदना ... 😊📌

जे वेदांनाही जमले नाही
ते वेदना सांगुन जाते ।
गुंज अंतरीचे कानी
मग हळुच गाऊन जाते ॥

करते घायाळ अशी की
जणु वाघिण चावुन जाते ।
ही वेदनाच असते खरी
कोण खरे दावुन जाते ॥

करते मज अस्वस्थ हल्ली
उगाच घडीभर राहुन जाते ।
तिच्या जराश्या सहवासानेही
हास्य गालीचे वाहुन जाते ॥

अशी कशी ही चेटकीण
क्षणात सुख खाऊन जाते ।
आठवण माझी येता लगेच
परतण्या मजपाशी धावुन येते ॥

नकोच असते कोणालाही
उगा सोबती वेदना ।
पण सावलीसम सोबतीला
राहतेच ही वेदना ॥

कधी ओठांमधुन हळुच बाहेर
निघते थरथरत वेदना
कधी नयनी पापण्यांमध्ये
बसते दडुन वेदना ॥

✍शशिकांत मा. बाबर
📱९१३०६२०७३४

सलाम

२६ जुलै
कारगिल विजय दिवस पर सबको शुभकामनायें और शहीदों को विनम्र श्रद्धांजली
💐💐💐💐💐💐

📌 👏सलाम ..👏📌

तिरंगेको सलाम मेरा
हर पल  तिरंगेको सलाम
नशा है बढा राष्ट्रभक्तीका
ईसके बढकर ना कोई जाम


हिमालय की चोटीको सलाम
सियाचिन की घाटी को सलाम
यहाँ के मिट्टी मे है भगवान
यहाँ जगह जगह पे है धाम ॥

पावन भुमी यहाँ की
बहती पावन गंगा
कही प्रेमभाव की बौछार
कही होता है दंगा
भिरभी प्यारा हमसबको
जानसे अपना तिरंगा ॥

कारगिल की मिट्टी अबतक
भुली नही हो नरसंहार ॥
भारत माँ के लालोंने कैसी
दे दी दुश्मन को हार ॥

अब क्या औखात कीसकी
कोई ले ले हमसे पंगा ।
चाहें जो करना है कर लो
शान से लहराहेगा तिरंगा ॥

कर ले आज तिरंगे को सलाम
देश के किसान को सलाम ।
सीमाओं पे लढने वाले
जाँबाज जवानों को सलाम ॥

✍शशिकांत मा. बाबर
📱९१३०६२०८३४

मोहिनी

📌 🍵 मोहिनी 🍵📌

चाँदनी की चाह में
मैने कहाँ दोस्तसे ,
मै भी तो चाँद की तरह हूँ
माना की दाग है चेहरे पे
लेकिन दिलसे साफ हूँ
वक्त वक्त पे अपना काम करता हूँ
जैसे रात मे सूरज का काम करता हूँ ॥

वो बडे प्यारसे बोला,
माना तु चाँद है
दिल तेरा साफ है
लेकिन जेब तेरी खाली है
तु बिन बगीचे का माली है
और सुन मेरी बात
तेरे पास है सारा ज्ञान
लेकिन तु नही है सलमान
इसलिये तबीयत और जेबपे
दोस्त मेरे दे तु ध्यान ॥

यह २१वी सदी है भाई
यहा चाँदनी चाँद के पीछे नही
चंदे के पीछे होती है ॥

यूँ तो मैं रहता हूँ खामोश
लेकिन आज आया था जोश
सुनके लेकिन बाते यह
उड गये आज मेरे होश ॥

अब ना कोई चाँदनी
ना ही कोई रागिनी
सुबह शाम अब बस
खुलके पिओ चाय मोहिनी ॥

✍शशिकांत मा. बाबर
(बोररांजणी, जि.जालना)
📱९१३०६२०८३४

® Share If U agree....
😋😋😋😋😋😋😋

बदल

📌📌  बदल....📌📌

गजबजलेली गर्दी चहुकडे
पण आवाज येत नाही ।
आवाज इथे बंद झाले
की काने बधिर झाली ॥

वाढलाय नुसताच गोतावला
पाहिजे क्षणात सारे आता ।
यंञवत झाले जगणे की
 माणसे अधिर झाली ॥

कळेना काहीच हल्ली
सुरक्षित ना इथे गल्ली ॥
जनावरे तरी शहाणी झाली
पण माणसेच जनावरे झाली ॥

सारेच इथे गड्या आता
अगदी अजब गजब आहे ।
मंदिरे ओसाड इथे अन्
भरगच्च भरलेले पब आहे ॥

देवा तुच सांग आता
इतके कसे बदलले जग ।
साचेच बदलले तु की
आपोआप बदलले हे नग ॥

✍शशिकांत मा. बाबर
( बोररांजणी, जि. जालना )
📱९१३०६२०८३४

पुल

महाडच्या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या सर्वांना भावपुर्ण श्रद्धांजलि💐💐

सदर रचना त्यांच्या पावन स्मृतीस अर्पण करतो....

💥   पूल   💥

इथे कधी, तिथे कधी
कोसळतो पहा पूल ।
माणसासारखाच आता
निसर्गही देतोय पहा हूल ॥

कुठे काही घडले की
मगच येते आम्हा जाग ।
जो तो भरलेला पण
शोधती दुसर्यावरचे दाग ॥

गेल्या नाहि बस नुसत्या
सारे प्रवासी वाहुन गेले ।
साविञीच्या पाण्याने त्यांचे
संसारही मोडुन नेले ॥

आता चालु शोधमोहिम
एकामागुन एक सापडतील सारे ।
एकदा का झाले सगळे
पुन्हा पहिल्यासारखे वाहतील वारे ॥

असे काही घडल्यावरच
चालु होते सारी चर्चा ।
वाद-विवाद अन् चौकशी
विरोधकांचा पुन्हा मोर्चा ॥

घडण्याआधी विपरीत
यांना काहि कळत नाही ।
कॅमेरा अन् पञकाराशिवाय
अश्रु यांचे गळत नाही ॥

ना कसली पाहणी कशाची
नव्हता कुणालाच घोर ।
जिथे तिथे जागोजागी
दडलेला प्रत्येकातच चोर ॥

चोरांची या पोटापेक्षा खिशाचीच
जास्त आहे भुक
'शशि' माञ नेहमीच सांगेल
हे सारे आहे चुक ॥

वाहण्याआधी दुसरा इथे
आता तरी कळायला हवे ।
करुन पाहणी गांभीर्याने
बांधायला हवे पूल नवे ॥

✍शशिकांत मा. बाबर
संपर्क :- ९१३०६२०८३४
दि. ०५/०८/२०१६
©copyright.

सोसल तेवढच सोशल

पटलं तर घ्या 📖📖📖
----------------------------------------

सोसल तेवढंच सोशल

खरे तर आज प्रगतीचे युग आहे . या स्पर्धेच्या, तंञज्ञानाच्या ,विज्ञानाच्या आणखी कशाच्या म्हणता येईल त्या युगात आपण जगत आहोत . सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत नव्हे बनलाच आहे . वर्तमानपञ,इंटरनेट या बरोबरच व्हाँटस अप, फेसबुक अन् व्टिटरच्या माध्यमानं त्याची व्याप्ति वाढली आहे . अबोलकी माणसंही या निमित्ताने बोलकी झाली.माणसानं नव्याचं स्वागत जरुर करावं पण जुन्याचा आदर्शही विसरता कामा नये. आज आम्ही या सोशल मिडियाचा किती वापर करतो आहोत . यामुळे आपण वेळ असुन व्यस्त झालो आहोत. पुर्वीच्या घरी रामकृष्ण अन् विरशिवाजीच्या गोष्टी सांगत असे आजी पण आता मोबाईलनच मारलीय बाजी. बाळ असते गुंग त्याच्या मोबाइल मध्ये अन् आजी बिचारी निवांत. त्या मोबाईलमध्येच तो कसल्या कसल्या गोष्टी पाहतो, ऎकतो ,मग दुसर्या गोष्टी ऐकायला त्याला वेळच कसा मिळणार अन् तसेही यमी अन् मम्मी एवढंच कळणार्या त्याला त्या आजीच्या राजाराणीच्या अन् सोनपरीच्या गोष्टी कशा कळणार. आणि गोष्टीतल्या सोनपरी ऐकायला त्याला कसे चालणार ,त्याची परी त्याला रोजचं हायबाय करत असतेच की आॅनलाईन . पूर्वी आपल्या घरची सुरवात जात्यावरच्या ओव्यांनी व्हायची आता हिच सुरवात एकाकीपणाच्या जाणिवेने अन् बारकाव्यांनी होते.पूर्वी घरची सकाळ आस्था टिव्हीने व्हायची आता हिच सकाळ एम टिव्हीने सुरु व्हायला लागली अन् साहजिकच राञ ' तुका झालासे कळस 'ने नाहितर ' तुक्या तुकविला नाग्या नाचविला 'ने होते. मी हे सर्व का सांगतोय ? सोशल मिडियाचा वापर तोही (गैर) वापर होतं असल्याने हे चिञ आहे . आज मोबाइल ही चैनीची वस्तु न राहता गरज बनली आहे. एवढच नाहितर या गोष्टींचं व्यसनं बनत चाललय. तंञज्ञानाने जगाला जवळ आणले हे जरी खरे असले तरी या सोशल मिडियाच्या अतिवापराने दुर दुर गेलीत माणसे. एकाच घरात राहणार्यांही परस्परात बोलायला वेळ नाहियं. सारं काहि अगदी तळहातावर हवं, अशी आपली मानसिकता झालीय. सार्याच गोष्टी जरा गुगल करुन बघु, म्हणत पाहिजे असतात आपल्याला . परस्परांची नाती जपण्यापेक्षा या सोशल मिडियाच्या तेलानं ती वातीसारखी जळु लागलीत. शेवटी एवढंच., या सोशल मिडियाचा सोसल तेवढाच वापर व्हावा कारण आईचे प्रेम अन् पावसाचा थेंब अजुन तरी नेटवर मिळत नाहीच.

✍शशिकांत मा. बाबर
( शिवव्याख्याते,बोररांजणी, जि. जालना ) 

धोका

📌📌  *धोका*  📌📌

देती आताशा मजला
माझीच माणसे धोका ।
दिला हाती दोर ज्यांच्या
त्यांनीच रोखला झोका ॥

ज्यांना आपुले समजले
त्यांनीच तिला धोका ।
विश्वास पाण्यावरी जरी
बुडते अचानक नौका ॥

हे सारेच असेच का
कुणीतरी हे सारे रोका ।
हरघडी हाय यांना
मी देतोच कसा मौका ॥

दोष त्यांचा कसा म्हणावा
ते त्यांचे खेळ खेळले ।
माझ्या साध्या चेंडुवर
त्यांनी लावला वेळीच चौका ॥

आता सारे कळुन चुकले
मीही जरा शहाणा झालो ।
त्यांच्याशी खेळाया मीही
त्यांच्याच रंगात न्हाऊन आलो ॥

*_✍शशिकांत मा. बाबर_*
संपर्क:- _९१३०६२०८३४_

खरच माझ्यावर प्रेम करतेस....?

📌 😊खरच सांग माझ्यावर प्रेम
करतेस.....? 😊📌

हल्ली तु मला पाहतेस
उगाच लाजतेस,गालात हासतेस
अन् तशीच निघुन जातेस
पण घरी गेल्यावर माझी कविता
न चुकता वाचतेस
खरच सांग माझ्यावर प्रेम करतेस ॥

हल्ली तु जास्तच सजतेस
घडी घडी आरशात पाहतेस
काही नसलं तरी उगाच
मागे वळुन पाहतेस
खरच सांग माझ्यावर प्रेम करतेस ॥

हल्ली तु बोलत नाहीस
थेट सरळ पाहत नाहीस
मग मी पाहिलं का म्हणुन
का मैञिणीला विचारतेस?
खरच सांग माझ्यावर प्रेम करतेस ? ॥

मन सांगते बोल आता
सांग काही जाता जाता
पण तु लगेच मौन धरतेस
अन् घरी गेल्यावर माझी कविता
मनातल्या मनात गुणगुणतेस
खरच सांग माझ्यावर प्रेम करतेस?

मी विचारलेला प्रश्न
आता नसेल सुटत तर सोडु  नकोस
नसेल ठरत तर बोलु नकोस
पण प्रश्न जिवंत ठेव काळजात
त्याला माञ मरु देऊ नकोस ॥

तसं तु करणार नाहीस
कारण तुही माझ्यासाठी झुरतेस
मग सांगायला का लाजतेस
सांगुन टाक एकदाचं
तु खरच प्रेम करतेस ॥

✍शशिकांत मा. बाबर
📱 ९१३०६२०८३४

तिरंगा

*Independence day special -----------*

💥🇮🇳 तिरंगा 🇮🇳💥

बोल रहा है तिरंगा
मन की बाते सारी, आज खोल रहा है तिरंगा

वो दिनभी क्या दिन थे
मेरे खातिर मरने को, हरकोई था तैयार
भारत माँ के बच्चे बच्चेने, सीने पे ले लिये वार
आझादी का सपना था
बच्चा बच्चा अपना था
मर मिटने का ,नही था कोई डर
याद न आती घरवाली , ना याद आता घर
उडने लगेथे हवाओं मे, फैलाये अपने पर
ऐसी और भी बातें है
सारी यादें खोल रहा है तिरंगा
बोल रहा है तिरंगा ॥१॥

आझादी को बरसों हो गये
फिर भी बेहाल है हिंदुस्तान
आझादी की कीमत को
शायद भुला है हिंदुस्तान
इसीलिए माँ,बहन, बेटी की
इज्जत का रहा नही सम्मान
कही घोटाला,कही बलात्कार
शहिदों के कफन को, बस यही मिला सत्कार
कारगिल की बातोंको, अबतक भुला ना पाया हुँ
न जाने कितने शहिदोंके ,सीनेपे मै सोया हुँ
काश्मीर की माटी से,सियाचिन की घाटी से
बोल रहा है तिरंगा ॥२॥

कहि मंहगाई,कही दहशत है छाई
कभी घाटी ,कभी पर्वत पर
मिट्टी बार बार है रोई
बंद करो अब तो आतंग,बस हो गयी ये जंग
बार बार कहता है तिरंगा
कितनें आयें कितने गये
हिमालय की चोटीपे लहराता है तिरंगा
भले मै छुँ लू गगन, फिरभी दुःखी है मेरा मन
लगा लगाके मलई , गोरी करली चमडी
लेकीन कालें हो गयें मन
कह सारी बातें ये, रो रहा है तिरंगा
सीसक सीसक के बोल रहा है तिरंगा ॥३॥

✍शशिकांत मा. बाबर
( बोररांजणी,जि. जालना )
📱९१३०६२०८३४

Sunday, August 14, 2016

स्वप्न

💥💥  *स्वप्न...*💥💥

एक होतं गाव
तिथे होतं एक ठुमदार घर
समोर छान बगीचा, एक मोठी कार
पाहायची स्वप्ने सारीच चंद्राची
गोष्टी इथल्या रती अन् इंद्राची ॥

तसच दुसरही होतं एक गाव
जरा दुर तटावर जाया तिथे नाव
तिथे माञ मिञा नव्हतं ठुमदार घर
कुठे होती झोपडी,कुठे भिंती लिंपती कर
यांना नव्हती कसली स्वप्न पडायची साखरेची
प्रश्न रोजच पडायचा,
काय खायचं अन् चिंता भाकरेची ॥

ही दोन गावं तशी पाहिली तर जवळ
पाहिली तर किसो दूर
एकीकडे पैशांचा धुर तर
 दुसरीकडे आसवांचा पुर
ही नव्हे कोण्या दंतकथेतली गावं
शोधल्यावर कळेल,ओळखीच वाटतील नावं
म्हणायला यांचा एकच आहे देश
दोघांच्याही हिशोबातला वेगळा आहे शेष
एक चकाकत्या इंडियातली स्मार्ट सिटी
दुसरीकडे कुपोषित भारताच्या नावाची पाटी ॥

आपण आपलं करायच असतं
आपण आपलं बघायच असतं
शेजारच्याशी आपलं देणंघेणं नसतं
हेच होतायत आमच्यावर संस्कार
म्हणुनच भेगाळल्यागत झाल्यात इथल्या वस्त्या
अन् दुभंगलीत इथली गावं ॥

सारा बिघडत चाललाय आकार अन् ऊकार
मग तुम्हीच सांगा कलाम सर
कसे अन् कधी होणार
स्वप्न तुमचे आमचे साकार ॥

*कवि:- शशिकांत मा. बाबर*
( बोररांजणीकर,जि. जालना)
संपर्क :-९१४०६२०८३४