Saturday, March 25, 2017

असच काहितरी

होय मी दुःख मांडतो कारण तेच वास्तव आहे .... कल्पनेतला गोड गुलाबी सुंगंध तुमचं मन भरत असेल पण रिकाम्या पोटांच काय....? त्यांची प्रश्न भेडसावतात माझ्या लेखनीला ...?
मग ती कशा लिहणार गोष्टी तलम रेशमी कापडाची जर तिने फक्त सतरा जागी शिवलेली चिंधीच जास्त जवळुन पाहिलेली आहे... तिन फाटलेला सदरा अन् घामान काळा खाप झालेला रानातल्या बापाचा रुमालच पाहिलाय तर ती कशा लिहिल गोष्टी तुमच्या सो साॅफ्ट कपड्यांची, तिन राकेलावर जळणारी चिमणी पाहिलीय अधिक जवळुन म्हणुन तर तुमच्या दिव्यांच्या जगमगाटात दिपतात तिचे डोळे, तिनं ढेकळांना सारुन झोपणारी माय पाहिलीय कुशीत शिरुन , मग कसं शक्य आहे तिला मऊदार गालिछांवर कविता करणं....?

पण म्हणजे तिला विकासावर, आधुनिकतेवर व्यक्त व्हायचं नाही असही नाही बरं .......

*✍शशि.....*
*📞९१३०६१०८३४*

No comments: