*गळफास बोलला फांदीला*
गळफास बोलला फांदीला
का गं ? एवढी गर्दी आज ह्या पांदीला
आज पर्यंत कसं सारं सुनं सुनं होतं
भेगाळल्या भुईवर काळं कुञही येत नव्हतं
मग अाज कसा आला ह्यो ताफा
भर उन्हाळ्यात कशा तोंडातुन वाफा
मी ही आज तोवर पडुन होतो सांदीला
कसा लटकलो ह्या सुकल्या फांदीला
गळफास लागला विचारू फांदीला............
........................................
वाळलेलं झाड बया पाखरांनी भरलं
ज्यान त्यान इथं येऊन का मौन धरलं
कुणीच काही बोलत नाही....
कालपासुन ह्यो बाॅ चिपकुन बसलाय मला
मलाही आता याचा भार तोलत नाही
कुणी तरी याला उतरवेल असं वाटतय
पण ह्यो लटकलाच का..? प्रश्नच पडतय
........................................
सुकलेली, पानं झडलेली फांदी
मग गळा दाटुन लागली सांगायला
मला काही हे नवं नाही बाबा,
माझ्या खालचा जवा करपुन जातो माल
तवा असच होतं सारं, जे झालं काल
कोण देईल उत्तरे लाखो हुंदक्यांची
पुसलेल्या कुंकवांची कोण घेईल जबाबदारी
किड्यामुंग्यांसारखी माणसं मरायला लागली
यापरिस बरी असते महामारी ...............
........................................
तु काय विचारतोस ह्या फांदीला
चल दोघं मिळुन आता विचारु
एकदाचं नोटेवरल्या गांधीला
सांदीला पडलेला दोर
कुठवर असा लटकत राहणार
बापु तुमच्याच देशात तुमचीच लेकरं
कुठवर मरत राहणार...........
........................................
डोळ्यावरचे हात काढुन , बापु माकडांनाही हे बघु द्या
कानांनी किंकाळ्या ऎकुन , तोडांनी काही बोलु द्या
तुमची खादी घालणारे , बापु इथं साधी भाषा बोलतच नाही
अन् त्यांचे जड जड शब्द , आम्हाला काही तोलतच नाही
नाहीतर बापु या देशात माती राहिल पण शेती नाही
अन् राहिलीच शेती तरी शेतकरी नाही....
........................................
*कवि:- शशिकांत मा. बाबर*
*संपर्क :- ९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*
गळफास बोलला फांदीला
का गं ? एवढी गर्दी आज ह्या पांदीला
आज पर्यंत कसं सारं सुनं सुनं होतं
भेगाळल्या भुईवर काळं कुञही येत नव्हतं
मग अाज कसा आला ह्यो ताफा
भर उन्हाळ्यात कशा तोंडातुन वाफा
मी ही आज तोवर पडुन होतो सांदीला
कसा लटकलो ह्या सुकल्या फांदीला
गळफास लागला विचारू फांदीला............
........................................
वाळलेलं झाड बया पाखरांनी भरलं
ज्यान त्यान इथं येऊन का मौन धरलं
कुणीच काही बोलत नाही....
कालपासुन ह्यो बाॅ चिपकुन बसलाय मला
मलाही आता याचा भार तोलत नाही
कुणी तरी याला उतरवेल असं वाटतय
पण ह्यो लटकलाच का..? प्रश्नच पडतय
........................................
सुकलेली, पानं झडलेली फांदी
मग गळा दाटुन लागली सांगायला
मला काही हे नवं नाही बाबा,
माझ्या खालचा जवा करपुन जातो माल
तवा असच होतं सारं, जे झालं काल
कोण देईल उत्तरे लाखो हुंदक्यांची
पुसलेल्या कुंकवांची कोण घेईल जबाबदारी
किड्यामुंग्यांसारखी माणसं मरायला लागली
यापरिस बरी असते महामारी ...............
........................................
तु काय विचारतोस ह्या फांदीला
चल दोघं मिळुन आता विचारु
एकदाचं नोटेवरल्या गांधीला
सांदीला पडलेला दोर
कुठवर असा लटकत राहणार
बापु तुमच्याच देशात तुमचीच लेकरं
कुठवर मरत राहणार...........
........................................
डोळ्यावरचे हात काढुन , बापु माकडांनाही हे बघु द्या
कानांनी किंकाळ्या ऎकुन , तोडांनी काही बोलु द्या
तुमची खादी घालणारे , बापु इथं साधी भाषा बोलतच नाही
अन् त्यांचे जड जड शब्द , आम्हाला काही तोलतच नाही
नाहीतर बापु या देशात माती राहिल पण शेती नाही
अन् राहिलीच शेती तरी शेतकरी नाही....
........................................
*कवि:- शशिकांत मा. बाबर*
*संपर्क :- ९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*
No comments:
Post a Comment