Saturday, March 11, 2023

MPSC2021 निकालाच्या निमित्ताने...

 




सध्या होत असणारी बरीच चर्चा एका विषया भोवती दिसतेय, तो विषय म्हणजे निकाल लागल्यावर, पोस्ट भेटल्यावर जे भव्यदिव्य आनंद साजरा केला जातोय..ज्या मिरवणुका काढल्या जातात...जे मोठ मोठे बॅनर लावुन विश्वनिर्मितीचे दाखले म्हणुन निकालाला दाखवले जाते हे सगळे खरंच गरजेचे आहे काय ? आनंद सगळ्यांनाच होतो..खरंतर तो झालाच पाहिजे, कारण बरीच वर्षी, बरीच मेहनत सगळं फळाला आल्यासारखं वाटणं हे साहजिकच आहे...पण...इथेच मोठा पण आहे...हे सगळं करताना..हे सगळं होत असताना...एक मोठा अभ्यास करणारा गट म्हणत असतो (किमान मनातल्या मनात तरी...) की बाबांनो, तुमच्या कर्मकहाण्या खुप ऐकल्या आता कामाचं बोला..तुमची मन की बात खुप ऐकली आता आमच्या काम की बात बोला...तुमचे जिद्द, परिश्रम, मेहनत, कष्ट, चिकाटी, सकाळी चार ला ऊठणं, गार पाण्याने अंघोळ, लायब्ररीत जाणारा पहिला मी, अन् बाहेर जाणारा शेवटचा मीच...अशा प्रचंड प्रेरणादायी प्रवासातुन मला मिळणारी उर्मी अन् तुम्हाला यशाची चढलेली गुर्मी दोन्हीही फार काळ टिकत नाही...बोलायचंच असेल तर काहितरी शाश्वत सांगा..अभ्यास कसा करायचा ते सांगा ? कोणत्या पेपरसाठी काय वाचु ते सांगा ? जुन्या पेपरचे विश्लेषण करा, पण नक्की काय करायचे ते सांगा ? अन् सगळ्यात महत्वाचे तुमची प्रेरणा याक्षेञाकडे एखाद्याला आकर्षुण घेण्यासाठी कामी येईल, आम्ही इकडे आलेलो आहोत आता यातुन बाहेर पडण्यासाठी काहीतरी सांगा...प्लिज कामाचं काहितरी सांगा.....

हे असं हल्ली काही वर्षा पुर्वी व्हायचं...मी जेंव्हा अभ्यास सुरु केला (2019) तेंव्हा हे जास्त प्रमाणात चालायचं...पण आता फरक दिसतोय ...काही निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी (अर्थात अधिकारी पण म्हणता येईल त्यांना) हे सगळं या क्षेञात चालणारं बदलुन नवं काहितरी करण्याचं ठरवलं ..अन् बदल जाणवु लागलाय...आता टाॅपर अभ्यासाचं बोलतात...प्रेरणेपेक्षा परिक्षेचं बोलतात...अंगावर गुलाल उधळुन घेण्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही, पण त्याच माखलेल्या गुलालाने काही अधिकारी काम की बात करण्यासाठी परिक्षार्थींना बोलत असतात...आई वडिलांच्या मेहनतीचे पांग फेडले हे सांगतानाच, मागे राहिलेल्या मिञांना सोबत आणण्यासाठी काय करता येईल ह्याचाही विचार ते करतात...ते दिभाभुल करण्यापेक्षा दिशा दाखवण्याचं काम करतात...तुमच्यात अदम्य साहस आहे, तुम्ही करु शकता...नव्हे तुम्ही कराच, असा अट्टाहास धरण्यापेक्षा नसेल जमत तर दुसरा पर्याय बघा...एकडे खरंच खुप काही चांगलच आहे असं नाही, हे स्पष्टपणे सांगण्याचं काम ते करतात...एकदंरीतच आता यशाचं, अपयशाचं फार कौतुक करण्यात रमण्यात व्यस्त असणारे कमी होताय, आपण तर झालो आता मागे राहिल्यांना पुढे आणण्यासाठी शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न ते करत असतात...हा बदल तुम्हाला दिसत असेलही, अन् जाणवत देखील असेल..पण तरीही अजुनही पुर्णपणे जुन्या सर्वच प्रथापरंपरा खंडीत झाल्यात असं मला वाटत नाही.. टाॅपर बोलतात काहितरी..त्यातले दोनचार कामाच्या वाक्याचे व्हिडीओ कट करुन सोशल मिडीया वर टाकायचे अन् प्रेरणेचे पाट वाहु द्यायचे..मग ह्या पाटातुन वाहणारं पाणी स्पर्धापरिक्षा ज्यांची शेती आहे अशांच्या शेताला जावुन मिळतं अन् त्यांचं पिक भरघोस जोमानं उभं राहतं..ह्या पिकाचा हंगाम काही एक नाही, हे बारमाही पिक आहे अन् इथला शेतकरीही हुशार आहे...असो.

हे सगळं होत असताना मला वाटतं निवड झालेल्या लोकांबद्दल जितकं परखड आपण बोलतो, अपेक्षा ठेवतो तितकच तयारी करणाऱ्या लोकांनी पण लक्षात ठेवायला हवे की आपण एक ग्रॅज्युएट झालेले व्यक्ती आहोत...भलबुरं, खरंखोटं सारं समजु शकतो..त्यामुळे आपल्या कामाचं काय हे सहज ओळखता यायला हवं..विजेत्यांच्या झगमगाटातुन आपल्याला वाट दाखवतील असे पथदिवे ओळखुन आपली वाट चालायला हवी..खरंतर एमपीएससी परिक्षेमध्ये फार काही कुणी सांगावं असं नाहिये...कुठल्याही गायडन्सने तुम्ही पास व्हाल, याची शाश्वती नाही... फक्त परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी (परीक्षेसाठी सगळेच करतात, परिक्षेचा अभ्यास केला पाहिजे) थोडी फार मदत नक्कीच होऊ शकते... ती घ्या अन् आपल्या अभ्यासाला लागा...मी स्वतः 2017 पासुन कुठल्याही टाॅपरचे भाषण ऐकले नाहीत....अभ्यासाबाबतीत मार्गदर्शन नक्कीच घेतले पण प्रेरणा म्हणाल तर आपल्याला ती आपल्या परिस्थितीतुनच मिळत असते, आपली परिस्थिती, आपल्या‌ आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवला की आपोआप प्रेरणेचे पाट आपल्या अंतःकरणात वाहु लागतात...त्याच आधारावर आपण आपला अभ्यास करायचा असतो...सतत...सातत्य हाच मुलमंञ आहे आपल्या अभ्यासाचा...एखादी गोष्ट वारंवार केली की आपोआप अवघड गोष्ट सोपी वाटते अन् सोपी गोष्ट सहज जमते..मला वाटते अभ्यास करत राहणे..कुठे काही अडलेच तर YouTube/Google वरुन एखादी संकल्पना समजुन घेणे अन् आपला अभ्यास चालु ठेवणे...एवढेच लागते परिक्षा पास व्हायला...टाॅपरची भाषणं ऐकुन परिक्षा पास झाला असा मला तरी कुणी माहित नाही..आपल्याला खुप खुप शुभेच्छा...👍

No comments: