प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळालच पाहिजे हा धरुच नये हट्टहास ... कारण काही प्रश्न निरुत्तरीतच बरे असतात त्यांची उत्तरं मिळाली की जास्त ञास होतो... म्हणुन तशीच सोडुन द्यायची असतात ती .. जरी असतील कितीही खास... कारणं त्यांच्या उत्तरांमुळे कदाचित केला जाईल आपला उपहास ... अन् मग बेचव लागेल तोंडातला घास.. गदमरु लागेल आपला श्वास .... कदाचित आवळल्या सारखा वाटेल गळ्याभोवती फास ... तु म्हणशील खरच का इतका होतं आतो ञास .....
अनुभव घेऊन बघ... अनुत्तरित प्रश्न सोडवुन बघ... अन् प्रश्नांनी वेढलेले जगणे जग... म्हणजे तुला आपोआप जाणवेल सारी धग...
पण राहुच दे ... तु आपलं मजेत जग... सार्यांच्याच नशिबी थोडाच असतो सारखाच वग... पण जळणारे काळीज अन् छळणारे प्रश्न येतातच कधी ना की वाट्याला ... म्हणुन आत्ताच सावध करतो...
जर तुलाही कधी पडलाच एखादा प्रश्न तर त्याला तसच सोड ... कारण....
काही प्रश्न निरुत्तरीतच बरे असतात... ते वेळ आल्यावरच सुटतात .. म्हणुन ते तेवढेच खरेही असतात......
✍शशिकांत मा. बाबर
www.shashichyamanatale.blogspot.com
अनुभव घेऊन बघ... अनुत्तरित प्रश्न सोडवुन बघ... अन् प्रश्नांनी वेढलेले जगणे जग... म्हणजे तुला आपोआप जाणवेल सारी धग...
पण राहुच दे ... तु आपलं मजेत जग... सार्यांच्याच नशिबी थोडाच असतो सारखाच वग... पण जळणारे काळीज अन् छळणारे प्रश्न येतातच कधी ना की वाट्याला ... म्हणुन आत्ताच सावध करतो...
जर तुलाही कधी पडलाच एखादा प्रश्न तर त्याला तसच सोड ... कारण....
काही प्रश्न निरुत्तरीतच बरे असतात... ते वेळ आल्यावरच सुटतात .. म्हणुन ते तेवढेच खरेही असतात......
✍शशिकांत मा. बाबर
www.shashichyamanatale.blogspot.com
No comments:
Post a Comment