Tuesday, December 27, 2016

असच काहीतरी

माणुस उगाच मृत्युला नाव ठेवतो.त्यापेक्षा जास्त ञास तर जीवन देते.पण माणुस खरच विचिञ प्राणी आहे, टोचणार्या काट्यांपेक्षा बोचणारी फुलं त्याला वाईट वाटतात.

आयुष्यात कोणी नसल्याच दुःख जास्त वाटत नाही. पण अचानक कोणी यावं आणि स्वप्नागत दुर जावं हे त्याला कधीच सहन होत नाही. म्हणुन आयुष्यात एकदा आपल्या जवळ आलेली माणसं दुरावणार नाहित याची जास्त काळजी घ्यायला हवी. कारण नाती तुटताना आवाज होत नाही पण सारं मन बधिर होतं अन् मग धीर मिळावा तरी कसा.

पण यासार्या बरोबरच यातनेचे कितीही डंख बसले तरी पुन्हा पंख पसरवून तो आयुष्याला रंग देण्यासाठी भंग पावलेल्या स्वप्नांच्या तुकड्यावरुन उठुन शोधु लागतो नवा संग अन् घेतो भरारी जसा उंच उडावा एखादा विहंग. आणि हो असच तर जगावं सार्यांनीच नाहीतर फक्त देहात श्वासोच्छावास करण्याच माध्यम बनुन राहण्यात कुठली आलीय मजा.

#असच काहितरी...
#शशिच्या मनातलं.....

✍शशि..

No comments: